मैं

मैं
मैं

Thursday, April 22, 2010

पैसे द्यायचे, तिकीट काढायचे आणि चित्रपट पाहायचा.. चित्रपट ही आपल्यासाठी एवढी सोपी गोष्ट असते. परंतु ज्या काळात चित्रपट या माध्यमाचा पाया भारतात रचला तेव्हाची परिस्थिती कशी होती, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. एखाद्याने चित्रपटक्षेत्रात जायची इच्छा व्यक्त केली तर आजही त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना काळजी वाटू शकते. मग दादासाहेब फाळके यांनी हे कसे काय साधले असेल? इंग्लंडमध्ये चित्रपट तयार करण्याची ऑफर धुडकावून भारतात चित्रपट उद्योग उभा करण्यासाठी परत आलेल्या या माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटाची कथा परेश मोकाशी या दिग्दर्शकाने ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’मध्ये सांगितली आहे. त्यावेळी चित्रपट म्हणजे हलणारी चित्रे असे वर्णन केले जात असे. काहींना तर हा भुताटकीचा प्रकार वाटत असे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट करण्याचा हा प्रवास चित्रपटात ‘फॅक्टरी’मध्ये अत्यंत मजेशीर पद्धतीने येतो. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून या चित्रपटाची निवड झाली होती. अलीकडेच प्रादेशिक चित्रपट विभागात ‘फॅक्टरी’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरविले गेले.म्हणून हा चित्रपट खर्च करून पाहण्यासारखा आहे . नसीरुद्दीन शहा, अर्शद वारसी आणि विद्या बालन यांच्या ‘इश्कियाँ’चे दिग्दर्शन अभिषेकने केले आहे। खालुजान (नसीरुद्दीन शहा) आणि बबन (अर्शद वारसी) हे दोघेही गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत असतात. म्होरक्याच्या तावडीतून सुटून हे आपल्या तिसऱ्याच मित्राच्या घरी आसरा घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी मित्राऐवजी त्याची विधवा पत्नी कृष्णा वर्मा (विद्या बालन) भेटते. हे दोघेही तिच्या प्रेमात पडतात. पण खालुजान आणि बबनची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी आहे. कृष्णासुद्धा कधी साधी भोळी तर कधी कपटी वागते. अशा या अनोख्या त्रिकोणाची कथा म्हणजे ‘इश्कियाँ’. गीते - गुलजार, संगीत - विशाल भारद्वाज, संवाद - विशाल भारद्वाज अशी नावे या चित्रपटाशी जोडलेली आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांना ‘चॉइस’ उपलब्ध नाहीच.
हे याच्यासाठी सांगावास वाटल की हरिशचंद्राची फैक्ट्री ते इश्किया हा प्रवास किती एका डिरेक्टर किंवा चित्रपतासम्बन्धी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या जीवनातला एक सुखद अनुभव आसेल ....

याचबरोबर आपण थोडीशी चर्चा करू नटरंग या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी फिल्मची ........

रवि जाधव निर्देशित चित्रपट नटरंग हा आनंद यादवांच्या "नटरंग " या कादंबरीवर आधारित एक चित्रपट आसून नटरंग या नावातच जणू पूर्ण चित्रपटाचा आत्मा दर्शकांच्या नजरेला पडतोआणि चित्रपट पाहताना प्रेक्षक हा सुरुवाती पासूनच खुर्चीला खिलुन राहतो ....कारणही तसेच आहे ....'मला जाऊ दया ना घरी ' या अतिसुन्दर लावणी पासून

No comments:

Post a Comment